Tuesday, February 17, 2009

गाना मेरे बस की बात नही|

चित्रपटांसाठी गाणी लिहीणारया ग़ीतकारांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. अर्थातच, अर्थपूर्ण गाणी लिहिणारया गीतकारांबद्दल! म्हणजे एक विशिष्ट प्रसंग आहे, त्याला अनुसरुन गाण लिहायचय. गाण्यातून तो प्रसंग, त्याला साजेशा भावना व्यक्त करण हे किती छान जमत या लोकांना!

कधी कधी योगायोगानेच म्हणा, वास्तविक आयुष्यामधे काही प्रसंग घडत असतो आणि नेमक त्याच वेळी, त्या प्रसंगाला साजेस अस गाण (रेडिओ, टेप किन्वा टि.व्ही. वर) सुरु होत. 'A right song at right time' ;). अशावेळी त्या प्रसंगाची स्थिती बदलूही शकते. उदाहरण द्यायचे झाले तर,

- समजा एखादी व्यक्ती खूप टेन्शनमधे आहे, नेमक त्याच वेळी गाण, लागल 'मितवा सुन मितवा, तुझको क्या डर है रे, ये धरती अपनी है, अपना अम्बर है रे' झाल, त्याच टेन्शन थोड तरी का होईना किन्वा त्या वेळेपुरत तरी कमी होईल :).

- नुकतच वयात येत असलेला एखादा मुलगा. त्याला कोणीतरी मुलगी आवडायला लागलीये.तो कॉलेजमधून घरी आलाय आणि इतक्यात रेडिओला गाण सुरु झाल, 'पहला नशा, पहला खुमार...' मग काय साहेब एकदम स्वप्नांच्या दुनियेत ;)!!!

- Graduation/PG पूर्ण झाल्यावर convocation ceremony सुरु आहे. विद्यार्थीदशेतून बाहेर पडणारया प्रत्येक मुलाला/मलीला भावी आयुष्याची स्वप्न खुणावतायत. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक नव पर्व सुरु होत आहे. अशावेळी गाण सुरु होतय, 'लिये सपने निगाहोंमे चला हू तेरी रहोंमे, जिन्दगी, आ रहा हू मै' :)

- एक मुलगी जिच्याघरी आता तिच्या उपवर होण्याची चर्चा सुरु आहे. ती हे सगळ ऐकतीये आणि गाण लागतय, 'हमको आजकल है इन्तजाSSSर, कोई आये लेके प्याSSSSर'

- एखादा आयुष्यात खूप दुःखी झालाय, आणि नेमक गाण लागलय 'मेरा जीवन कोरा कागज...' अम्म्.....नको नको हे गाण नको. ते त्याला आणखी उदास करेल. अशावेळी लागाव, 'ऐ जिन्दगी गले लगाले, हमनेभी तेरे हर एक गम को गलेसे लगाया है, है ना' हे गाण नक्कीच त्याच्या मनात एक आशेचा किरण जागा करेल! :)

- तरूण मुला/मुलीन्ना बरयाच वेळा घरी-दारी काहीतरी उपदेशाचे डोस सुरु असतात. पण समजा एखाद्यावेळी हा डोस जरा जास्तच व्हायला लागला आणि ऐकणारा आता पूर्णपणे पकलाय. गाण लागतय 'ए हटा सावन की घटा...' :) यावेळी बोलणारयाला नाही पण ऐकणारयाला मात्र मनापासून हसू येईल. पण तोही मनातल्या मनातच हसेल. नाहीतरदुसरा डोस सुरु व्हायचा!!

- एका नातवाची आजी त्याच्यावर रागावून रुसून बसलिये आणि नेमक गाण सुरु झाल, 'दादीमा दादीमा, प्यारी प्यारी दादीमा, देखो जरा इधर देखो गुस्सा छोडो दादीमा' नातवाने आजीकडे पाहिले, दोघांची नजरा-नजर झाली,आजीची कळी खुलली आणि राग कुठल्या कुठे पळाला!

- एखादा मजनू त्याच्या लैलाला पटवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण ती मात्र त्याला भाव देत नाहीये. कुठल्याशा प्रसंगाने ते अचानक एकमेकांसमोर आले आणि नेमक ग़ाण सुरु झाल, 'दर्दे दिल दर्दे जिगर, दिलमे जगाया आपने..' मजनू तर एकदम खूश होऊन जाईल. त्याला तर हेच हवे होते. ;) पण लैलाची काय अवस्था होईल? तिला बिचारीला कुठे पळून जाऊ अस होईल!

- एखादीच लग्न ठरलय, घरी मेहेन्दीचा कार्यक्रम सुरु आहे, गाण लागतय, 'फुलले रे क्षण माझे फुलले रे..'

- लग्न उद्यावर आहे. वडिल आणि उपवर मुलीचा संवाद सुरु आहे. नेमक गाण लागत, 'दाटून कंठ येतो..' दोघानाही एकदम गहिवरून येतं, दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटलय. भावना एकमेकांपर्यंत पोचल्यात. आता बोलायच काहीच नाही. लेक बाबांच्या गळ्यात पडते आणि दोघेही अश्रूंना वाट मोकळी करून देतात. बस्स बस्स.. फारच emotionally touchy moment सुरु आहे.

तर मला म्हणायच अस की गीतकार जी गाणी लिहितात ती फक्त त्या विशिष्ट चित्रपटातल्या विशिष्ट प्रसंगापुरतीच मर्यादित नसतात. तर त्यातल्या भावभावना generalised असतात. म्हणजे त्या भावभावना तुमच्या-माझ्या आणि जवळ जवळ सगळ्याच (normal) माणसांच्या भावनांच सादरीकरण करतात. या गीतकारांना नेमके शब्द सुचतात तरी कसे? अस वाटत मला कधी जमेल का अशी गाणी लिहायला? नाही म्हणायला शब्द, यमक जुळवून कविता लिहिण्याचा प्रयत्न जरुर करते. पण आम्हा पामराला अस छान लिहायला कुठे जमतय? शेवटी सरड्य़ाची धाव कुंपणापर्यंतच!(इथे मी उदाहरणादाखल ही म्हण वापरलीये. याचा अर्थ असा होत नाही की मी सरडा आहे.) पण गीतकारांकडे ही प्रतिभा उपजतच असते.

Hats off to गुलजार, जावेद अख्तर, प्रसून जोशी (my fav) आणि त्यांच्या या प्रतिभेलाही सलाम! सध्यातरी 'गाना (लिखना) मेरे बस की बात नहीSS'

2 comments:

Kasturi said...

Khoopach chan lihilayas..nakkich gani aikunach kittekada apan dipression madhun baher padato.... self counselling sathi ya ganyanchach tar adhar asato...

Aparna said...

:)