Friday, February 27, 2009

येशील का परतून कधी?

येशील का परतून कधी विश्वात माझ्या
भरशील का रंग स्वप्नात माझ्या
मिटल्या डोळ्यात दाटले पाणी,
बांध हा पुन्हा रोखशील का कधी..
मूक ओठात हरवले शब्द,
माग तयान्चा घेशील का कधी
लोपलेल्या सुरान्चे,
कोमेजलेल्या कळ्यान्चे,
देणे देशील का कधी
परतून येशील का कधी...
परतून येशील का कधी..?

Tuesday, February 24, 2009

वादळवाट - शीर्षकगीत

वादळवाट - शीर्षकगीत
थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले.
कधी उतरला चन्द्र तुझ्या-माझ्या अंगणात,
स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत.
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदी काठ
कधी हरवली वाट...
वारया-पावसाची गाज,
काळी भासे गच्च दाट.
कधी धुसरं धुसरं,
एक वादळाची वाट..
- मंगेश कुलकर्णी

ऐकलय हे गाण? अजूनपर्यंत नसेल ऐकल तर जरुर ऐका.

रुळलेल्या वाटा आणि पोळलेली मने...

टायटल वाचल्यावर, विषय गंभीर आहे असं वाटतय ना! हम्म... पण विषय गंभीर आहे किंवा नाही यापेक्षा तो कसा समजावून घेतला जातोय हे महत्त्वाचं आहे. मला जे जाणवल, ते फक्त इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
लहान असताना, एक प्रश्न मला बरयाचदा विचारला जायचा, 'काय मग तू मोठेपणी कोण होणार?' मी फारसा विचार न करता सांगायचे 'मी डॉक्टर होणार.' अस मी का सांगायचे हे मला त्यावेळी सांगता नसते आले. कदाचित 'डॉक्टर' होण हे मला एक प्रतिष्ठेच लक्षण वाटायच. पण मग मला हे समजल कुठून? मोठ्या लोकांच्या गप्पांमधून? अमक्याचा मुलगा डॉक्टर झाला, तमक्याची मुलगी इंजिनिअर झाली. नाव काढल हो पोरांनी.' त्यांना मिळणारा भाव पाहिल्यावर, स्वतःहालाही अशाच भूमिकेत जगासमोर मांडल्यावर आपणही चांगले नाव कमावल्यासारखे होईल अशी माझ्या मनाची समजूत झाली असणार. नक्कीच!
खरच डॉक्टर, इंजिनिअर याच ठराविक वाटा आहेत का चांगल करिअर घडविण्याच्या? इथे मी, या करिअरमधे असणारया किंवा करिअर घडवू पहाणारयांकडे बोट दाखवत नाहीये. तर मला असं म्हणायचय की लहानपणी मूल जेव्हा घडत असतं तेव्हा कुठलीही गोष्ट त्याच्या मनावर बिंबवण्यापेक्षा, त्याच्या मनाचा नैसर्गिक कल जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याच करिअर घडल तर ते खरया अर्थाने त्याला आयुष्यभर समाधान देत राहील.
'job satisfaction' ही संज्ञा कुठून आली? आज मी कितीतरी मुला-मुलींना पहाते,इंजिनिअरींगची डिग्री घेऊन चांगल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी करतायत. पगारही चांगला आहे! पण नोकरीमधे समाधानी नाहीत. नोकरीची सुरूवातीची वर्षे नव्या नवलाईमुळ छान वाटतात. पण नंतर जेव्हा जाणवायला लागत की या नोकरीमधे स्वतःचा interest/liking कमी आहे, तेव्हा मन अस्वस्थ व्हायला लागत. मग जाणवत की आपण हे करिअर निवडताना 'मनाचा कौल' घेतलाच नाही. केवळ रूळलेल्या वाटेवरून चालत गेलो. आपण ज्याप्रकारची नोकरी करतोय तिथे आपल्यामधे असलेलं potential/talent पुरेपूर वापरल जात नाहीये. ही जाणिव सतत टोचत रहाते. अशावेळी काहीजण PG करायच ठरवतात. पण यावेळीमात्र निर्णय डोळसपणे घेतला जातो. PG कशात करायच? का करायच, कुठे करायच, माझा interest कशामधे आहे इ. पुन्हा पहिले पाढे गिरवायचे नसतात ना म्हणून!
काहीजण मी असेही पाहिले आहेत, ज्यानी चांगल्या पगाराची/हुद्द्याची नोकरी सोडली. प्रमुख कारण म्हणजे No job satisfaction. आणि नंतर पूर्णवेळ प्रशासकीय सेवेत जाण्याची तयारी सुरू केली. त्यामधे ते यशस्वीसुद्धा झाले. अशाप्रकारे नवीन मार्ग शोधून तिथे आपले बस्तान बसविणारे नक्कीच समाधानी होतात. पण ज्यांना दुसरा मार्ग सापडत नाही किंवा सापडला तरी परिस्थितीमुळे तो मार्ग निवडणे त्यांना शक्य होत नाही त्यांच काय? अस नाही की ते आयुष्यात यशस्वी नसतात. पण जर job satisfaction नसेल तर potential असूनही ते १००% देऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी आयुष्य खूप मेकॅनिकल होऊन जात का? (Rock On मधे फरहान अख्तरने जे character केलय तसं).
काही लोक असतात ज्यांना खूप लवकर समजत की त्यांना आयुष्यात पुढे काय करायचय. पं. भीमसेन जोशी हे असच एक व्यक्तिमत्त्व आहे. किती लहान वयात त्याना समजल होत की 'मला शास्त्रीय संगीत शिकायचय'. त्यावेळी गाण्यात करिअर घडवायच वगैरे असे विचारही त्यांच्या मनात आले नव्हते पण स्वतःची गाण्याची आवड त्याना कळाली होती. आणि पुढे त्यांची घडलेली कारकीर्द आपल्याला माहीत आहेच. अशा व्यक्ती खरच खूप भाग्यवान असतात.
हल्लीची मुले करिअरच्याबाबतीत अगदी चोखंदळ आहेत. दहावी-बारावीची परीक्षा देत असतानाच त्यांचे PG कशात करायच आणि कुठे करायच इथपर्यंतचे planning झालेले असते. पालक आणि मुलांनी करिअर निवडताना संवेदनक्षम राहिल तर पुढे कोमेजणारया/पोळणारया मनांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

Sunday, February 22, 2009

किती बडबड सुरू आहे....

बोलणं, बोलत रहाणं हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. मनातले विचार, भावना व्यक्त करण्यासाठी त्या 'बोलून दाखवता येणं' ही माणसाला मिळालेली एक देणगीच आहे. या देणगीचा प्रत्येकजण आपापल्यापरिने वापर करत असतो. काही व्यक्ती मितभाषी असतात तर काहींना सतत बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृति! एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बडबडा असेल तर तिला गप्पा मारण्यासाठी कोणाची ओळख लागतेच असे नाही. एखाद्या नवख्या ठिकाणीसुद्धा, लोकांशी ओळख काढून बोलण सुरू होतं आणि मग गप्पांचा ओघ सुरूच रहातो. अशावेळी यांना बोलायला एकामागोमाग एक विषय सुचतात तरी कसे, याच मला खरच आश्चर्य वाटत.(मला स्वतःला असे विषय सुचत नाहीत ना म्हणून मला आश्चर्य वाटत!)
बरयाचदा बोलण ही माणसाच्या स्वभावाची गरज होऊन जाते. म्हणजे जेव्हा मनावर एखाद्या गोष्टीचा ताण असतो किंवा मनात एखादे द्वंद्व सुरू असते, अशावेळी आपलं मन स्वतःशीच संवाद साधत रहातं. पण जेव्हा आपण हा ताण, हे द्वंद्व कोणाजवळतरी बोलून दाखवतो, तेव्हा खरचं खूप हलक वाटतं. भलेही त्यावेळी त्य परिस्थितीतून मार्ग मिळतोच असं नाही पण नक्कीच मनावरचा भार अंशतः तरी कमी होतो.
कधीकधी आपण अनुभवलेली एखादी गोष्ट किंवा एखाद्या विषयाबद्दलचं आपल ज्ञान, आपली मतं यांची चर्चा करावी अस वाटत किंवा आपली विचारसरणी कुठेतरी पडताळून पहावी अस वाटत. अशावेळी ऐकून घेणारी कोणी व्यक्ती असेल तेव्हा तिच्यासमोर आपण भडभडून बोलतच रहातो. अगदी समोरच्या व्यक्तीलाही आपल्या बोलण्यातला उत्साह जाणवेल इतके आपण भारावल्यासारखे (fully charged होऊन) बोलतच रहातो. :)
खरच 'बोलण' हे माणसाला अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी मिळालेलं एक साधन आहे. त्याचा योग्य वापर करण हीदेखील एक कलाच आहे!

Wednesday, February 18, 2009

म्युझिक मस्ती आणि (गणपती) डान्स!!!


डान्स करायला कोणाला आवडत नाही??

मला वाटत की प्रत्येकाला डान्स करायला आवडत पण जसजसं वय वाढेल तसतसं आपल्या आत असलेला 'डान्सर' लोप पावत जातो. प्रत्येकाला अगदी 'हृतिक' सारखा छान डान्स जमेलच अस नाही. तसा अट्टहासही नाही. पण संगीताच्या ठेक्यावर ताल धरायला प्रत्येकाला येत. आपल्या आत असलेली डान्स करण्याची ऊर्मी बाहेर पडायला तेवढ पुरेसं आहे. :) मलाही नाचायला खूप आवडत. लहान असताना शाळेत गॅदरिंगमध्ये नाच, नाटक यात भाग घ्यायचे. पण कॉलेजला गेल्यावर नाचायची सन्धीच मिळाली नाही. :(

डान्सचे सगळेच प्रकार छान असतात. पण मला विशेष आकर्षण वाटत ते 'गणपती डान्स'चे! आता 'गणपती डान्स' म्हणजे काय हे सान्गायची गरज आहे अस मला तरी वाटत नाही. पण तरीही ज्याना माहिती नाही त्यांच्यासाठी - 'कोणीही आपल्याकडे बघत नाही अशी मनाची समजूत घालून, कानावर पडणारया संगीताच्या बोलावर/तालावर मनसोक्तपणे हात-पाय हलवत नाचणे' म्हणजे 'गणपती डान्स'!!गणेशोत्सव मला आवडतो याच मुख्य कारण म्हणजे माझा लाडका देव 'गणपती' आणि दुसर कारण म्हणजे 'गणपती डान्स'. गणेशोत्सवाचा पहिला आणि शेवटचा दिवस म्हणजे सगळ्या डान्सर्रसना पर्वणीच असते. मिरवणुकीत नाचणारे अगदी बेभान होऊन नाचत असतात. तो नाच बघण म्हणजे निव्वळ मनोरंजन असते. अर्थातच, मी काही मिरवणुकीत जाऊन नाचत नाही.(याबद्दल मला नेहमीच वाईट वाटत, की मी मुलगा का नाही झाले :( ) साधारण ८ ते १०वी मधे असताना, मिरवणूक बघायला लागले की नाचणारयांचा जोश पाहून मलाही संचारल्यासारख व्हायच. मग बाहेर चाललेल्या मिरवणुकीच्या तालावर माझा घरामधे 'गणपती डान्स' सुरु व्हायचा. आणि माझा डान्स बघण्यासाठी एकमेव प्रेक्षक म्हणजे माझी आई! ती आपली माझा डान्स बघून हसत बसायची. मिरवणूकीत जी गाणी लावतात त्यांच म्युझिकच अस असत की ते तुम्हाला ताल धरायला लावत. काही गाणीही अशी असतात की ती कानावर पडली की अंगात नाचाच वार संचारतच बघा! अशी गाणी तयार करणारया संगीतकारांच आणि गीतकारांच कौतुक नक्की कराव लागेल. काही गाणी like 'कोंबडी पळाली..', सन्दीपच 'ढिपाडी ढिपांग..', 'धूम मचाले..', 'अब के सावन ऐसे बरसे..'(शुभा मुदगल्)(या गाण्याच्यावेळी पाऊस पडत असला तर मग काय आणखीनच मजा!), 'चमचम करता' ,'मौजाहि मौजा', 'हम्मा हम्मा','के सेरा सेरा', 'देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार..' अशी कितीतरी गाणी सान्गता येतील.

तर या नाच करण्याच्या मोहापायी एकदा एक गम्मतशीर किस्सा घडला. एकदा संध्याकाळी ८.३०-९ च्या सुमारास सगळीकडे लाइटस गेले होते. इतक्यात कुठूनतरी जोरजोरात लाउडस्पीकरवर गाण्याचे आवाज ऐकू यायला लागले. काय आहे ते बघण्यासाठी मी आणि माझी बहीण टेरेसवर गेलो. शेजारच्या गल्लीमधे कोणाच्यातरी घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. तिथे generator सुरु असल्याने गाणी सुरु होती. बाकी कुठेच लाइटस नव्हते. टेरेसवरही अन्धार होता. मग काय तिथेच 'गणपती डान्स' सुरु केला. :) अगदी हवे तसे हात-पाय हलवत, धुन्द होऊन आमचा नाच सुरु होता. साधारण १०-१५ मिनिटे आम्ही नाचत होतो. इतक्यात शेजारच्या टेरेसवर हालचाल दिसली. मी थोडे थांबून, डोळे बारीक करुन पाहिल तर काय??? तिथे काही लोक बसले होते आणि ते आमच्याकडेच बघत होते!!! अन्धारात आम्हाला काही दिसलच नव्हत. माझी बहीणपण तोपर्यंत भानावर आली होती. आम्ही काहीही न बोलता तिथून धूम ठोकली. खाली आल्यावर आम्हाला काय कराव/बोलाव ते सुचतच नव्हत. तो शॉक पचायला थोडा वेळ गेला. नंतर मात्र आम्ही दोघी पोट धरून हसत होतो. :) आमचा नाच बघणायरयांचही 'free entertainment' झाल होत :). तर अस हे नाचाच वेड!!

पण हल्ली नाच खूप मागे पडलाय. नाचाची आवड प्रत्येकाला असली तरी मिरवणूकीत जाऊन नाचणे प्रत्येकालाच शक्य नसते. बरयाचदा तिथे manners/status असे अवघड शब्द आडवे येतात. मग ही नाचाची आवड, ही ऊर्मी पूर्ण कशी करायची? म्हणूनच का हल्ली disc,pub ची संस्कृती वाढू पहातीये?मोकळेपणाने नाच करण वेगळ असत. नक्कीच तुम्हाला relaxed वाटेल. पुन्हा charge झाल्यासारखे वाटेल. पण नाचाच्या नावाखाली चालणारे विक्षिप्त प्रकार मात्र अजिबात समर्थनीय नाहीयेत. 'मनमोकळेपणाने नाचणे' आणि 'नैतिकता सोडून नाचणे' यात नक्कीच फरक आहे. कारण status/manners च्या नावाखाली जर मिरवणूकीत नाचण टाळलं जात तर नीतिमत्ता सोडून पबमध्ये नाचण कितपत योग्य आहे? अर्थातच मिरवणूकीत दारू पिऊन झिंगणारयांचही मी समर्थन करणार नाही.

शरीर आणि मन ताजतवान करण्यासाठी नाचा. बाकीचे चोचले पुरवण्यासाठी नको. प्रत्येकाने स्वतःमधला 'डान्सर' जिवंत ठेवला पाहिजे. संगीताच्या तालावर ठेका धरुन हालणारे हात-पाय रोखू नका. चार-चौघात लाज वाटते? मग एकट असताना नाचून बघा. पण ही ऊर्जा ओघवती ठेवण्याचा प्रयत्न जरूर करा!

Keep dancing...

Cheers. :):):)



Tuesday, February 17, 2009

गाना मेरे बस की बात नही|

चित्रपटांसाठी गाणी लिहीणारया ग़ीतकारांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. अर्थातच, अर्थपूर्ण गाणी लिहिणारया गीतकारांबद्दल! म्हणजे एक विशिष्ट प्रसंग आहे, त्याला अनुसरुन गाण लिहायचय. गाण्यातून तो प्रसंग, त्याला साजेशा भावना व्यक्त करण हे किती छान जमत या लोकांना!

कधी कधी योगायोगानेच म्हणा, वास्तविक आयुष्यामधे काही प्रसंग घडत असतो आणि नेमक त्याच वेळी, त्या प्रसंगाला साजेस अस गाण (रेडिओ, टेप किन्वा टि.व्ही. वर) सुरु होत. 'A right song at right time' ;). अशावेळी त्या प्रसंगाची स्थिती बदलूही शकते. उदाहरण द्यायचे झाले तर,

- समजा एखादी व्यक्ती खूप टेन्शनमधे आहे, नेमक त्याच वेळी गाण, लागल 'मितवा सुन मितवा, तुझको क्या डर है रे, ये धरती अपनी है, अपना अम्बर है रे' झाल, त्याच टेन्शन थोड तरी का होईना किन्वा त्या वेळेपुरत तरी कमी होईल :).

- नुकतच वयात येत असलेला एखादा मुलगा. त्याला कोणीतरी मुलगी आवडायला लागलीये.तो कॉलेजमधून घरी आलाय आणि इतक्यात रेडिओला गाण सुरु झाल, 'पहला नशा, पहला खुमार...' मग काय साहेब एकदम स्वप्नांच्या दुनियेत ;)!!!

- Graduation/PG पूर्ण झाल्यावर convocation ceremony सुरु आहे. विद्यार्थीदशेतून बाहेर पडणारया प्रत्येक मुलाला/मलीला भावी आयुष्याची स्वप्न खुणावतायत. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक नव पर्व सुरु होत आहे. अशावेळी गाण सुरु होतय, 'लिये सपने निगाहोंमे चला हू तेरी रहोंमे, जिन्दगी, आ रहा हू मै' :)

- एक मुलगी जिच्याघरी आता तिच्या उपवर होण्याची चर्चा सुरु आहे. ती हे सगळ ऐकतीये आणि गाण लागतय, 'हमको आजकल है इन्तजाSSSर, कोई आये लेके प्याSSSSर'

- एखादा आयुष्यात खूप दुःखी झालाय, आणि नेमक गाण लागलय 'मेरा जीवन कोरा कागज...' अम्म्.....नको नको हे गाण नको. ते त्याला आणखी उदास करेल. अशावेळी लागाव, 'ऐ जिन्दगी गले लगाले, हमनेभी तेरे हर एक गम को गलेसे लगाया है, है ना' हे गाण नक्कीच त्याच्या मनात एक आशेचा किरण जागा करेल! :)

- तरूण मुला/मुलीन्ना बरयाच वेळा घरी-दारी काहीतरी उपदेशाचे डोस सुरु असतात. पण समजा एखाद्यावेळी हा डोस जरा जास्तच व्हायला लागला आणि ऐकणारा आता पूर्णपणे पकलाय. गाण लागतय 'ए हटा सावन की घटा...' :) यावेळी बोलणारयाला नाही पण ऐकणारयाला मात्र मनापासून हसू येईल. पण तोही मनातल्या मनातच हसेल. नाहीतरदुसरा डोस सुरु व्हायचा!!

- एका नातवाची आजी त्याच्यावर रागावून रुसून बसलिये आणि नेमक गाण सुरु झाल, 'दादीमा दादीमा, प्यारी प्यारी दादीमा, देखो जरा इधर देखो गुस्सा छोडो दादीमा' नातवाने आजीकडे पाहिले, दोघांची नजरा-नजर झाली,आजीची कळी खुलली आणि राग कुठल्या कुठे पळाला!

- एखादा मजनू त्याच्या लैलाला पटवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण ती मात्र त्याला भाव देत नाहीये. कुठल्याशा प्रसंगाने ते अचानक एकमेकांसमोर आले आणि नेमक ग़ाण सुरु झाल, 'दर्दे दिल दर्दे जिगर, दिलमे जगाया आपने..' मजनू तर एकदम खूश होऊन जाईल. त्याला तर हेच हवे होते. ;) पण लैलाची काय अवस्था होईल? तिला बिचारीला कुठे पळून जाऊ अस होईल!

- एखादीच लग्न ठरलय, घरी मेहेन्दीचा कार्यक्रम सुरु आहे, गाण लागतय, 'फुलले रे क्षण माझे फुलले रे..'

- लग्न उद्यावर आहे. वडिल आणि उपवर मुलीचा संवाद सुरु आहे. नेमक गाण लागत, 'दाटून कंठ येतो..' दोघानाही एकदम गहिवरून येतं, दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटलय. भावना एकमेकांपर्यंत पोचल्यात. आता बोलायच काहीच नाही. लेक बाबांच्या गळ्यात पडते आणि दोघेही अश्रूंना वाट मोकळी करून देतात. बस्स बस्स.. फारच emotionally touchy moment सुरु आहे.

तर मला म्हणायच अस की गीतकार जी गाणी लिहितात ती फक्त त्या विशिष्ट चित्रपटातल्या विशिष्ट प्रसंगापुरतीच मर्यादित नसतात. तर त्यातल्या भावभावना generalised असतात. म्हणजे त्या भावभावना तुमच्या-माझ्या आणि जवळ जवळ सगळ्याच (normal) माणसांच्या भावनांच सादरीकरण करतात. या गीतकारांना नेमके शब्द सुचतात तरी कसे? अस वाटत मला कधी जमेल का अशी गाणी लिहायला? नाही म्हणायला शब्द, यमक जुळवून कविता लिहिण्याचा प्रयत्न जरुर करते. पण आम्हा पामराला अस छान लिहायला कुठे जमतय? शेवटी सरड्य़ाची धाव कुंपणापर्यंतच!(इथे मी उदाहरणादाखल ही म्हण वापरलीये. याचा अर्थ असा होत नाही की मी सरडा आहे.) पण गीतकारांकडे ही प्रतिभा उपजतच असते.

Hats off to गुलजार, जावेद अख्तर, प्रसून जोशी (my fav) आणि त्यांच्या या प्रतिभेलाही सलाम! सध्यातरी 'गाना (लिखना) मेरे बस की बात नहीSS'

मेरी fattyness/fitness से मेरी उम्र का पताहि नही चलता!

माणसाच्या आयुष्यात 'फिटनेस'च किती महत्त्व आहे?
माझ उत्तर आहे, 'हो, खुप महत्त्व आहे.' म्हणजे बघा, काही सुप्रसिध्द म्हणी/सुविचार मी उदाहरणादाखल देते. 'Health is Wealth' ( उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे.), 'Early to wake & early to rise, makes man healthy, wealthy & wise'. म्हणजे फक्त wealthy आणि wise असण पुरेस नाहिये. 'Health' नावाचा दागिना असेल तर व्यक्तिमत्त्व जास्त खुलुन दिसत. हे सगळ प्रास्ताविक करण्याच कारण म्हणजे मला माझे काही 'फिटनेस'चे अनुभव सान्गायचे आहेत.
इन्जिनिअरिन्गच्या ४ वर्षात माझ्या तब्येतीत बरीच प्रगती झाली! म्हणजे आधी जर मी खात्या-पित्या घरची वाटत असेन तर आता 'अति'-खात्या आणि 'अति'-पित्या घरची वाटायला लागले होते. सहाजिकच नातेवईक आणि मित्र-मैत्रिणीन्कडून त्याची पोचपावती मिळत होतीच मला! घरात माझ्या भावाशी माझ भान्डण झाल आणि आमची बाचा-बाची सुरु झाली की मला गप्प बसवायला त्याला एक छान उपाय मिळाला होता. मी काही बोलायच्या आतच तो म्हणायचा की 'आधी स्वतःकडे बघा आकार कुठे चाललाय ते! वाढता-वाढता वाढे, भेदिले शून्य मन्डळा!' आता दुखणारी नस दाबली गेल्यावर काय, मी पण गप्प बसायचे. पतन्ग उडवण्याचे दिवस असले की तो मला 'झब्बू' पतन्ग म्हणून चिडवायचा! बाबा मला पूर्वीही सान्गायचे पण आताही(जास्त intensly) सान्गू लागले, 'बेटा, सूर्यनमस्कार हा सर्वान्गसुन्दर व्यायाम आहे. रोज करत जा.' यातला मतितार्थ आपण समजून घ्यायचा- 'आपल अन्ग सुन्दरपणाच्या सीमा ओलान्डून चाललय, त्याकडे जरा लक्ष द्या.' तसा व्यायामाबद्दल मला आदर आहे पण तो करायचा म्हटल की 'आळस' नावाचा माणसचा शत्रू माझ्या इच्छाशक्ती(?) वर मात करायचा.
एकदा असच मी खरेदीसाठी फिरत असताना एक गजरे विकणारा छोटा मुलगा माझ्या समोर आला आणि म्हणाला, 'क़ाकू गजरा घ्या ना'. (काकू? मी? नहीSSSSS!! अरे अजून माझ लग्नपण नाही झाल.) नन्तर एकदा मला बेळगावला माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जायच होत. एस्.टी. ची चौकशी करण्यासाठी मी कण्डक्टरकडे गेले. तो म्हणाला, 'वहिनी, तुम्ही समोरच्या एस्.टी. मधे जाऊन बसा.'(काSSSय? वहिनी? This is too much Aparna, आता तरी हात-पाय हलवा.)
नन्तर जेव्हा नोकरीला लागले तेव्हा नाही म्हटल तरी धावपळ व्हायचीच, पण एवढ असूनही वजनाचा काटा काही हलत नव्हता! माझी आई मात्र मधेच तोन्डावर हात फिरवून म्हणायची, 'पोर किती सुकलीये कामाने'(आईच काळीज, काळजी करणारच!). पण आता मात्र मी मनावर घेतल होत. रोज सकाळी नियमितपणे व्यायाम सुरु केला. हा आता अधुन मधून तो माणसाचा शत्रू (आळस त्याचे नाव) डोक वर काढायचा, पण माझी इच्छाशक्ती त्यावर मात करायची. थोडे दिवसानी gym ला जाऊ लागले. रोज न चुकता १-१.३० तास व्यायाम करायचे. सुरुवातीला थोडा-थोडा व्यायाम करायचे पण नन्तर व्यायामाची आवड आणि stamina जसजसा वाढत गेला तसतसा व्यायामासाठीचा वेळही वाढत गेला. रोज trademillवर पळताना जाणवायच की कालच्यापेक्षा मी आज जास्त अन्तर पळाले किन्वा situps करताना जाणवायच कि आज count वाढलाय. रोज असा शरीर पिळवटून टाकणारा व्यायाम झाला आणि अन्गावर निथळणारा घाम पाहिला कि छान वाटायच. मी स्वतःवरच खुश व्हायचे. पण हो, एक मात्र आवर्जून सान्गेन,व्यायाम करत होते पण कधी 'diet'च्या नादाला नाही लागले. जमणारच नाही हो! समोर छान-छान पदार्थ दिसत असताना 'diet'च्या नावाखाली जिभ आवरती घेण आमच्या तत्त्वातच बसत नाही! तर आता हे व्यायामाच अस एक छान routine सुरु झालय. आता अगदी मी adict झालीये व्यायामाच्या सवयीची, अस म्हटल तरी चालेल.
हे अस सुरु असताना, पूर्वी मला जे अनुभव आले त्याच्या अगदी उलट अनुभव यायला लागले.खूप दिवसानी कोणी नातेवाईक/मित्र-मैत्रीण भेटले की म्हणायचे 'बारीक झालीस ग, काय करतेस?'
एकदा आईच्या एका मैत्रिणीकडे गेले होते, तर तिथे आलेल्यान्पैकी एकीने मला विचारले 'तू कोणत्या शाळेत आहेस?'(This was too much. तिच्या चष्म्याचा नम्बर वाढला असावा कारण एव्हढी बारीक मी नक्कीच नाहिये.) काही compliments अशाही मिळाल्या. 'काय अपर्णा, आणखी किती बारिक होणार, पुरे आता. काय करिष्मासारख '०' figure व्हायचाय का!' (आता या compliment देणारयाविषयी सान्गायच झाल तर - अशी व्यक्ती जी स्वतः जाड आहे. त्याची तिला जाणीवदेखील आहे, पण व्यायामाचा कन्टाळा. 'diet' तर नाहिच नाही.)
असो! तर या आणि अशा प्रकारच्या comments/compliments ऐकताना अन्गावर मूठभर मांस चढणार नाही याची काळजी मी घेत आहेच. पण राहून राहून मला दूरदर्शनवरची ती सन्तूर साबणाची जाहिरात आठवते. 'मेरी त्वचासे मेरी उम्र का पताही नही चलता' ! पण इथे मात्र आधी अस होत कि 'मेरी मोटापेकी वजहसे मेरी उम्र का पताही नही चलता'आणि आता अस आहे की मेरी fitness कि वजहसे मेरी उम्र का सही पता चलता है'