Wednesday, March 18, 2009

मै और मेरी तनहाई....

प्रत्येकाची एक ठरलेली दिनचर्या असते. नेहमी ती तशीच साचेबद्ध असते अस नाही. या ठराविकपणापेक्षा वेगळ असही काही घडत असतं. नेहमीच्या गोष्टी/प्रसंग सांभाळता सांभाळता अशा नविन गोष्टींनाही सामोर जाव लागत. रोजच्या धावपळीत कधीतरी काही जुने प्रश्न डोक वर काढतात तर काही नवे निर्णय आपल्या वाटेवर वाट पहात उभे असतात. कधी काही गोष्टी वेळेअभावी करायच्या राहून गेलेल्या असतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी वेळेच व्यवस्थापन कस कराव याचा विचार करायलाही आपण सवड काढलेली नसते. या सगळ्या गोष्टी अशाच साचून राहिल्या तर विचारांचा खूप गोंधळ उडतो मनामधे. सगळेच विचार एकदम डोक्यात थैमान घालू लागतात. मग थोडी चिडचिड वाढते. एकाग्रता थोडी कमी होते कारण मन कुठल्या एका विचारावर स्थिर नसत, बरयाच विचारांनी ते व्यापून राहिलेल असतं. अशावेळी स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची गरज असते. जरा स्वतःला एकांतात घेऊन जावं...
एकांत माझ्याशी खूप बोलतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो, माझ्याबरोबर हसतो, परिस्थितीला पर्याय सुचवतो, एखाद्या गोष्टीवर विचार करण्याचा नवा दृष्टिकोन देतो, गोंधळलेल्या मनाला समजावून घेतो आणि योग्य ती समजही देतो. डोकं शांत होतं. मनातले प्रश्न मागे टाकून पुढे पळणारया आयुष्याला क्षणभर विसावा मिळतो, स्थिरता मिळते. खूप छान मोकळ वाटतं. पुन्हा नेहमीच्या धावत्या चाकावर स्वार व्हायला मन तयार होत.
जेव्हा मानसिक गरज असते तेव्हा जरूर एकांतात रहाव. हो पण सारख सारख नाही बरं का! :)

2 comments:

Yawning Dog said...

Bharee lihites haan tu, sagalee posts vachalee atta :)

Aparna said...

dhanyawad